Thursday, 5 January 2017

शिक्षण म्हणजे स्वतःची प्रतिभा ओळखून त्याची साधना...!!!

मी माझ्या मुली करता सध्या शाळा हुडकत आहे, तसे ऐकाला योग्य वाटणार नाही पण शाळा हुडकत नसतात तर शाळा निवडत असतात (ही माझी धारणा आहे). तसे आजची परिस्थिती व शिक्षणाचा बाजार पाहता हुडकणेच योग्य शब्द वाटतो. तसा मी या मोहिमेवर मागील दोन महिन्यापासून आहे. अमुक एक फ्लोवेर, तमुक एक ट्री किंवा आश्रम, गुरुकुल आशी नावे असणारी व Industry म्हणून घेणारी आशी School नावाची Factory ला आठवड्यातून ३ या प्रमाणे मी भेट देत आहे, कधी ambiance अवडला नाही तर कधी teachers चे pronunciation बरोबर नव्हते, तर कधी फीस परवडणारी नव्हती. म्हणजे एकूण काय माझ्या समोरील प्रश्न सुटण्या पेक्षा जास्त गडध होताना दिसत आहे. बर अभ्यासक्रम तर वेगळाच cbsc, icse, igcse, state board इत्यादी, भाषा विषय किती, गणित कोणते वैदिक की आणखी काही, इतिहास कुठला, भूगोल कोणाचा, आणि विज्ञान कशाचे हे सुद्धा समजण्या पलीकडचे. बाकी संगीत, क्रीडा, नाट्य आणि नृत्य हे वयाच्या ३ वर्षा पासूनच म्हणजे एवढा अभ्यास करता करताच त्या फुलांनी कोमेजुनच जायचे. स्वतःचे आशे काही निर्माण करण्याची क्षमताच त्यांच्यातून नष्ट होणार आहे असे दिसते, फक्त “टक्केवारीची भरती” एका school ने तर माझाच Interview घेतला माझी तीन महिन्याची salary slip आणी घरात राहणार्याचे  NOC येवड्या KYC वर मला शाळेबदल माहिती दिली, जसे काही मलाच admission  घ्यायचे होते. एका School मध्ये मला CRO(Customer relation officer) ने मला त्याचे School कसे optimistic असून बाकीचे कसे orthodox आहेत हे पटून दिले. एकूण काय तर दिलेले target  achieve करण्याकरिता चालेली धडपड. अर्थात यात त्या CRO ची काही चूक आहे असे मला वाटत नाही किंवा त्या शाळेची.

कारण शिक्षणाची Industry झाल्यावर हे असेच होणार, जे व्रत म्हणून आयुष्यभर जपावे, तपस्या म्हणून आयुष्य यती बनून राहावे असे शिक्षण आज पूर्ण बदलले आहे. शिक्षण कसे अभिनव पद्धतिने घेता येऊ शकते याबद्दल एक ही जन बोलायला तयार नाही. शिक्षणाची Traditional म्हणवली गेलेली पद्धत केव्हाच गेली पण आता जी आहे ती सुद्धा फार Innovative आहे असे वाटत नाही. “शिक्षण म्हणजे स्वतःची प्रतिभा ओळखून त्याची साधना करणे” असे मला वाटते पण त्या नाजूक कळ्याना त्यांच्या प्रतिभेची ओळख होताना आजच्या शिक्षण पद्धतीतून दिसत नाही, दिसते ते फक्त पालकांच्या इच्छेचे ओझे. याच ओझ्या खाली ते नाजूक विद्यार्थी दबून गेले आहेत.
   Sprouts                                                   विराज                   

Monday, 2 January 2017

#वेळअमावास्या

आज वेळअमावस्या (#येळअमावस्या) आहे, मराठवाड्यातील ग्रामीण भागातील एक वैशिष्ट पूर्ण उत्सव. आजचा दिवस #उस्मानाबाद, #लातूर आणि #सोलापूर जिल्हातील काही भागात एक वेगळा पण शेतीशी नाळ जोडणारा हा उत्सव साजरा केला जातो. येळअमावस्या एक प्रकारे कृतज्ञ: सोहळा आसतो शेती बद्दलचा. शेतकरी आपल्या जवळचे नातलग-मित्रपरिवार घेऊन त्याच्या शेतात ग्रामीण संमेलन साजरे करत आसतो. #पारंपारिक_वेशभूषा, #लोककला, आणी #ग्रामीण जेवणाचा आनंद लुटत आसतो. ज्यातून तो गेल्या सहा महिन्यातील त्याच्या कष्टाचे प्रदर्शन तर मांडतोच पण यातून कृषी पर्यटनाला सुद्धा वाव मिळतो, #ग्रामीण_अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

शेतकरी मित्र परिवारसहित शेतात पूजा करतो, नंतर शेतात बनवलेल्या भोजनाचा पारंपारिक पद्धतीने आस्वाद घेतो, रान मेव्याचा आनंद लुटतो. आशा या ग्रामीण उत्सवाला(#Rural_Event) जरूर भेट द्या....