Tuesday, 19 June 2018

राष्ट्रऋषी


तात्यारावांच्या जीवनाचा अभ्यास करताना हे जाणवते ते म्हणजे, "राष्ट्र" हा जीवनाचा गाभा मानून त्याभवती आपल्या प्रतिभेच्या सर्व क्षेत्रातील तपस्येतुन जीवन पुष्प अर्पण करणे म्हणजे #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर. १८९८ साली #चाफेकर_बंधू ना फाशी देण्यात आली त्या रात्री भंगुर मधील स्वगृही कुलस्वामिनी समोर घेतलेल्या प्रतिज्ञे पासून," देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन!" सुरु झालेला हा स्वातंत्र्य यज्ञ आणि त्यात दिलेल्या आयुष्यातील एका एका आहुती मुळे हा #स्वातंत्र्यऋषी आ चंद्र-सूर्य अमर झाला आहे. प्रचंड प्रतिभा लाभलेला विलाक्षन बुद्धिमत्ता असलेला बंडखोर विद्यार्थी, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा नेता आणि कुशल संघटक, #१८५७चा_स्वातंत्र्यसमर लिहणारे इतिहासकार, ब्रिटिशांना त्यांचाच देशात सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक, ५० वर्षाच्या दोन काळ्या पाण्याच्या शिक्षेला पुरून उरलेला मृत्युंजय, रत्नागिरीस स्थानबद्ध असताना समाजसुधारण्याची चळवळ करणारा कर्ता समाजसुधारक, अलौकिक वक्तृत्वाचे धनी, मराठीभाषेचे शुद्धीकारण करणारे भाषाप्रभु, रत्नागिरीस अस्पृश्याच्या हातून मंदिरातील देवाची स्थापना करणारा जात्युच्छेदक, विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ हिंदू समाजाची निर्मिती करणारा कार्यकर्ता, अजरामर काव्य संपदा असणारा कवी, उत्कृष्ट लेखक आणि नाटककार. या सर्व प्रतिभा असून सुद्धा फक्त मातृभूमीचा भारतमातेचा सुपुत्र म्हनून घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्याच काव्य पंक्ती प्रमाणे," गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा !" सर्वकाही मातृभूमी करीत अर्पण करणे हेच व्रत तात्याराव यांनी जन्मभर पाळले,"तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण". पण जन्मभर आणि मृत्यूंनंतर सुद्धा प्रचंड अवहेलनाच मिळाली त्यांना. या तेजस्वी स्वातंत्र्य यज्ञा भवती इचकत वाचकत तोंड करून नाचणारे माकडं आज सुद्धा दिसतात. तरी ही अधर्माच्या महासागरातील दीपस्तंभा प्रमाणे अढळ स्थान निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज १३५वी जयंती त्या निमित्याने विनम्र अभिवादन.

©विराज

पावसाळा !!!

२००८ ला पुण्यात आलो शिक्षणा करिता, त्या अगोदर आयुष्यातील २०-२२ वर्ष मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान भागात घालवले होते, त्यामुळे पावसाचे वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. तस पावसाळा हा फार काही आवडता ऋतू वगैरे आहे असे मला वाटत नाही, सौमित्र (गारवा अलबम) मध्ये जस म्हणतो तसेच काहीस माझे मत आहे. पावसाळा फार काही मला रुचत ही नाही आणि पटत ही नाही. म्हणजे उन्हाळ्यात मनावर धूळ साचते, आणि पावसाच्या पाण्याने त्याचा चिखल होते. मरगळ येऊन जाते साली पावसाळ्यात मनावरती. खूप नवल वाटते जे पावसाळ्याला रोमँटिक म्हणतात, कवीची कल्पना मान्य हो पण वास्तव असे काही आहे का नाही जगात ! पावसाळा मुळातच चिकट आणि चिवट मग तो रोमँटिक कसा असेल. कृषी विज्ञान शाखेत शिक्षण झाल्यामुळे पावसाचे महत्व जाणतोच पण ते सुद्धा पावसाचे वास्तववादीच स्वरूप आहे, उगाच फापट पसारा नसतो त्यात.
-------------------------------------------------------------------
 मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादला असताना पावसाळा फार काही असतंच नाही. उस्मानाबाद चा पाऊस म्हणजे कधी तरी वेळ काढून पडणारा आणि काही वेळे पुरताच. म्हणजे कधी कधी तर पडला तर पडला नाही तर कोरडा गेलेला पावसाळा सुद्धा मला आठवतो, त्यामुळे पावसा बद्दल फार काही आकर्षण मनात निर्माणच झालं नाही. पावसात भिजवा म्हटलं तरी अर्ध अंग कोरडेच राहायचे आणि पावसाचे पाणी भिजण्यासाठी नसून पन्हाळीतून एकत्र करून वापरण्यासाठी असते  असा काहीसा उस्मानाबादचा पाऊस. म्हणजे आमच्या इकडे पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडायचे ते पावसाच्या पाण्यापासून वाचण्याकरीत की उन्हं पासून हेच कधी कधी समजायचे नाही. आमच्या इकडे पाऊस कमी असला तरी माणसाच्या मनातील गारवा कधी कमी झाला नाही.
------------------------------------------------------------------
पुण्यात आल्यावर खरा पावसाळा कळायला लागलं, स्टाईलीश छत्री पेक्षा गोल व काळी छत्री कशी उपयोगी पडते ते पुण्यात कळले. एका छत्रीत एकानेच प्रवास करावा. रेनकोट पूर्ण अंग झाकणार आणि दुहेरी शिवणीचा असावा असे काहीसे नवीन नियम पावसाळ्याचे कळले. दिवस दिवस पाऊस असणे आणि ओले चिंब भिजणे पुण्यात आल्यावर कळले. पावसाळ्यात कांद्याचे गरम गरम भजे करणे हे स्वाभाविक आहे पण बियर च्या ऐवजी विस्की-रम पिण्याची इच्छा होणे म्हणजे मुसळधार पावसाची सुरवात होय. सिंहगडावर भिजणे पर्यटन असते तर पुण्यात भिजणे कंटाळवाणे असते हा भिजन्य भिजण्यातला फरक, पावसाळा स्वतः सोबत वेगवेगळे रूप घेऊन येतो आणि हेच पावसाळ्याचे वैशिष्ट्य असते. त्याला स्थल-काल नियम लागू पडतात. उजाड वाळवंटात चैतन्याची पालवी फुलवतो पाऊस, घटकभराच्या शिडकाव्यातून बदलाची शक्ती देतो पाऊस...!!!

©विराज