Wednesday, 19 June 2019

Game of Thrones...!!!


"वराती मागणं घोड" हा वाक्य प्रचार आम्हाला चफलाक लागू पडतो, सगळं जग ज्यावेळी एखाद्या दिशेला धावत असतं त्यावेळी आम्ही कुठेतरी मागून चाचपडत उठून चालायला लागतोत. असा काहीसा हा प्रकार, मग स्वतःची समजूत काढण्याकरिता आणि झालेली चूक झाकण्याकरिता, "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" असे म्हणून समाधान मानतो. हे सांगायचं कारण असं झालं की, "गेम ऑफ थ्रोन्स", २०११ सालची वेब सीरिज समजायला आम्हला फेब्रुवरी २०१९ उजडावा लागला प्रत्यक्ष ते पाहण्यास सुरवात केली मे २०१९ पासून, कस बस एका मित्रा कडून ढापून आम्ही गेम ऑफ थ्रोन्स पहायला सुरवात केली. दररोज चुकता एक-दोन तर कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी तीन-चार एपिसोड पहायचा निर्धार केला, सध्या हा नित्यक्रम झाला आहे. जणू "पारायणं" चालू आहे (पारायणं ही बायकोची उत्क्रांती) कारण मी सध्या दररोज ऑफिस वरून आलो की पुढचा एपिसोड सुरु करून पाहत असतो त्यात माझा संध्याकाळचा वेळ जातो म्हणून पारायणं.

सुरवातीस मूळ कादंबरी वाचून वेब सीरिज पाहण्याचा माझा विचार होता, पण आजूबाजूला असलेल्या स्पॉईलर मुळे तो विचार मी बदलला आणि सरळ टेलिव्हिजन सीरिज च पारायणं सुरु केलं. ह्या मितितुन त्या मितीत भ्रमण केल्याचा अनुभव या टेलिव्हिजन सीरिज मुळे आपल्याला घेता येतो. आपल्या आजूबाजूला एखादा लॉर्ड किंवा राजा बसून वाईन चे चषकावर चषक संपवत असतो, कोठून तरी सैन्याच्या हालचालींचा आवाज येत असतो, लावण्यखणी राणी समोरून जात असते, तर कधी तलवारींचा खणखणाट व युद्धाच्या ललकारी कानात गुंजत असतात. "Game of Thrones" म्हणजे "सिहांसनाचा खेळ" किंवा "सत्तेचा खेळ" ह्या  टेलिव्हिजन सीरिज चा HBO  वाहिनीवर पहिला एपिसोड १७ एप्रिल २०११ रोजी टेलिकास्ट झाला तर शेवटचा १९ मे २०१९. साधारण ८ वर्ष चालू असलेली टेलिव्हिजन सीरिज George RR Martin यांच्या फॅन्टसी कादंबरी A Song of Ice & Fire वर आधारित आहे. हा सुद्धा सात पुस्तकांचा संच आहे व जो १९९६ ते २०११ या काळात प्रकाशित झाला. 

हा सिहांसनाचा खेळ मुख्यतः मानवाच्या तीन गरजांची संबंधित आहे. १) सत्ता (power) २) संपत्ती (Money) ३) सेक्स, ह्या तीन गरजा धरूनच पूर्वी पासून मानवच समाजकारण घडत आले आहे. त्याचे यथायोग्य चित्रण या सीरिज मध्ये दिसते. युरोप व पाश्चिमात्य देशातील मध्य युगीन कालखंडचे चित्रण या मालिकेत आपल्याला पहायला मिळते. एक प्रगत संस्कृती ज्यात व्यापार, कला, साहित्य, विज्ञान याचे दर्शन तर घडतेच पण त्याच बरोबर मानवाची सत्ता पिपासूं वृत्ती इतरांच्या जीवाची व इतर कशाची ही पर्वा न करता कोणत्याही थराला जाऊ शकते ह्याचे सुद्धा दर्शन होते. कालखंड मध्ययुगीन व युरोपातील असल्यामुळे सहाजिकच रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, नियम त्या काळातील आहेत. जन्म, मृत्यू आणि त्यांचे संस्कार सुद्धा त्या काळा प्रमाणेच दिसतात. या मालिकेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि लग्न संस्कार त्या वेळच्या समाजाचे सुद्धा महत्वपूर्ण अंग यात दाखवले आहे. भौगोलिक दृष्ट्या युरोप सोबत रशिया व चीन संस्कृती सुद्धा आपल्याला दिसून येते. उत्तर आफ्रिकेतील किंवा पश्चिम आशियातील देश असे सुद्धा चित्रण यात पहायला मिळते. पण स्थळ व ठिकाणांची नावे मात्र काल्पनिक आहेत. अर्थात ते मी येथे सांगणार नाही. मुळात लेखकाने हे काल्पनिक चित्र अत्यंत योग्य पणे आणि मापक रंगवले आहे. कोठेही अवास्तव व अति काल्पनिक मांडणी या सीरीज मध्ये नाही. दिगदर्शकाने सुद्धा cinematic liberty च्या नावाने मूळ कथेस कसलीही छेड छाड़ केलेली जाणवत नाही. 

वेग-वेगळी राज घराणे आणि त्यांचा सिहांसनावरील हक्क त्याकरिता चालणारे राजकारण या प्रमुख सुत्रा भोवती जरी हे कथानक विणलेले आसले तरी मानवाच्या विविध पैलूंचे दर्शन या माध्यमातून होते. मालिकेतील राज्य व्यवस्था ज्याप्रमाणे युरोपचा प्रभाव जाणवतो त्याच प्रमाणे समाज व्यवस्थे वर ख्रिस्त धर्माचा प्रभाव जाणवतो. शारिरीक संबंधाच्या बाबतीत लेखकाने चांगलाच मोकळा हात सोडलेला दिसतो. शारिरीक संबंध हे नाते संबंधा पेक्षा महत्वाचे दाखवले गेले आहे. समलिगी संबंधनाची सुद्धा मांडणी या कथेत दिसून येते. मात्र कोणतेही शारिरीक संबंध मूळ कथेला धरूनच आहेत असे दिसते. कसल्याही प्रकारची अवास्तव अश्लील मांडणी कथेत नाही. “Night is full of dark, किंवा  Winter is coming”  आशा असंख्य संवाद कथानकाची उत्कंटा वाढवायला मदत करता. सर्व पात्रांनी योग्य अभिनय केला आहे

या सीरिज ची तुलना काही माध्यमातून महाभारताशी केलेली मला दिसली. काहींचे म्हणणे असे जाणवते की हे कथानक तेथील महाभारत आहे. मी या मताचा नाही मला हे कथानक इकडचे-तिकडचे महाभारत वाटत नाही. मुळात महाभारताचा एकांगी विचार करणाऱ्यांना असे वाटू शकते. "युद्ध" हा एकच निकष लावून लिहलेले हे कथानक कसे काय महाभारताशी तुलनात्मक असू शकते??? लेखकाने दिग्दर्शकाने कथेचे स्वातंत्र्य जपलेले दिसते, मात्र आपण याची तुलना जगातील कोणत्याही महा काव्याशी करणे मूर्ख पणाचे ठरेल.

सत्ताकारनाची आवड असणार्यांनी जरूर ही सीरिज पहावी कारण यातील प्रत्येक घटना त्याशिवाय पचनी पडणार नाही.

विराज



Sunday, 2 June 2019

Home Schooling




जून महिना आला की शाळा सुरु होण्याचे वेद लागतात, आणि डोळ्या समोरून सहज तरळून जातात लहानपनीच्या आठवणी, ते नवीन पुस्तकांचे वास, वह्या-पुस्तक खरेदीची लगबग, नवीन दप्तर, कंपास पेटी, पेन-पेन्सिल, रंग पेटी अनेक गोष्टी आठवतात. आता पूर्वी सारख्या जून मध्येच सगळ्या शाळा सुरू होतात असे नाही काही एप्रिल पासूनच चालू झालेल्या असतात. स्पर्धेच्या नावा खाली आणि  काही तरी वेगळं करायचं म्हणून आजकाल वर्ष भर शाळा चालू असतात, त्यामुळे शाळेच्या मोसमाची अशी मजाच लुटता येत नाही. जुने वर्ष कधी संपले आणि नवीन कधी सुरु झाले हे लक्षातच येत नाही. नाही त्या वेळेत भरमसाठ सुट्ट्या दिलेल्या असतात. आपलं आयुष्य किती पर्यावरणा वरती अवलंबून आहे हे संस्थाचालक विसरूनच गेले आहेत. आता हेच बघणं उष्णकटिबंधी (Sub Tropical) प्रदेशात राहणाऱ्या मुलांना हिवाळ्यात सुट्ट्या आणि उन्हाळ्यात शाळा असा काहीसा वेडपट प्रकार चालू असतो. त्यामुळे शाळा चालू होण्याचे काही नावीन्यच राहिले नाहीपण त्याबद्दल आज मी जास्त बोलणार नाही, तो आजचा विषय नाही.
मागील आठवड्यात मित्राच्या घरी चर्चा करत असताना शाळा सध्याचे शिक्षण याबद्दल बोलत होतो, आणि तेवढीच काळजी ही व्यक्त होत होती. शिक्षणाचे बाजारीकारण आणि शाळांचे शुल्क(fees) या मुळे बेजार झालेले पालक हे सर्व चर्चेत आलेच पण त्यापुढे जाऊन आजच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीने आपल्या पाल्यास स्पर्धक बनवायचे आहे का??
की जो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटने कडे फक्त स्पर्धा म्हणून बघेल त्यामागे धावत राहील, असे व्यक्तिमत्व जे सदा सर्वदा competition mode मध्ये राहील.  
की एक स्व: निर्मित व्यक्तिमत्व बनणे अपेक्षित आहे ज्याला "स्व" ची ओळख आहे. सर्जनशीलता (Creativity) आणि उत्कृष्टता (excellence) या दोन गोष्टींच्या भांडवलावरी आयुष्यात काही तरी निर्माण करू शकेल, ज्याचे पैसा हे परिमापक असणार नाही, ज्याचे पैसा  हे साधन असेल साध्य नसेल. असे व्यक्तिमत्व घडवने ही शिक्षणाची जवाबदारी आहे असे मला वाटते

त्यामुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीला फाट्यावर मारून Home Schooling नावाचा प्रकार जन्म घेताना दिसत आहे. Home Schooling म्हणजे काय तर आपल्या पाल्याला घरातूनच प्राथमिक शिक्षण देण्याची सुरवात करणे आवश्यक आणि गरजेचे सर्व काही त्याला शिकवणे. आई वडिलांनी त्यांचे गुरु होणे आणि समाजात त्यांना स्वतःचे स्थान निर्माण करता येईल असे बनवणे. Home Schooling प्रकारात आई-वडील शिक्षकाच्या भूमिकेत असता तर विद्यार्थी पाल्य असतो, आर्थिक बाबीचा विचार करता प्रचलित शिक्षण पद्धती पेक्षा खूप स्वस्त आणि उपयुक्त ठरू शकते. जस प्राथमिक शिक्षणाचे आहे तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणा चे करता येईल, फक्त आपल्याला आपल्या पाल्याची रुची आवड समजायला हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आशा-अपेक्षा त्याच्यावरती लादणे नसावे. पाल्याला डॉक्टर-इंजिनियर बनवण्याचे फॅड सध्या संपले असले तरी पैसे बनवण्याचे मशीन म्हणून त्यांचा कडे बघणे सोडावे लागणार आहे. दोन तीन पालकांनी एकत्र येऊन या प्रकारे गृह शाळा निर्माण केल्यास या प्रकारचे शिक्षण देणे सोपे होईल
या मधील सर्वात मोठी अडसर ही "समाज व्यवस्था" आणि "शासन व्यवस्था" आहेत. कारण हा त्यांचा विरोधातील उघड उघड केलेला बंड असेल, त्याला ते कितपत स्वीकारतील यात शंका आहे. सर्व पालकांना जरी या विद्रोहात सहभागी होणे शक्य होईल असे नाही, आर्थिक सामाजिक मानसिक बंधन आहेतच पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर प्रयत्न करावाRight of Children to Free and Compulsory Education (RTE) Act, 2009 नुसार भारताता  HS कायदेशीर आहे पण जो पर्यंत शासन व्यवस्था या शिक्षण पध्द्तीला मान्यता देत नाही तो पर्यंत सर्वसामान्य याला स्वीकारतीलच असे नाही.



धन्यवाद                

©विराज