Wednesday, 9 September 2020

बॉस्टन टी पार्टी

घरातून ऑफिस असल्यामुळे ब्लॅक कॉफी मिस करतो, आज सकाळी बायकोला सांगून खास ब्लॅक कॉफी करून घेतली. ऑफिस आणि कॉफी हे नवीन समीकरण जुळलं आहे. घरी चहा घेणाऱ्यां पैकी ९०% ऑफिस मध्ये कॉफी घेतात यात वेगळा असा काही नाही. मशीनमधल्या चहा पेक्षा कॉफी बरी लागते असे कारण असेल. जस भारतात एकूण चहाच प्रस्त आहे तस वेगवगळ्या देशात वेगवेगळ्या पेयांचा प्रस्त दिसत, सर्वच आशियायी देशात चहाची आवड दिसते त्यामानाने ब्रिटन सोडून इतर पाश्चिमात्य देशात चहा पेक्षा कॉफी च प्रस्त आहे. प्रत्यक्ष असं कारण काहीच नाही पण एक प्रासंगिक घटना या निमित्याने आठवली म्हणून हा धागा लिहायला घेतला.

वर्ष होत १७७३ च अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध चा सुरवातीचा काळ होता. अमेरिका त्यावेळी भारता प्रमाणेच ब्रिटनची वसाहत होती(colonial rule). ब्रिटन ची एक महत्व पूर्ण कंपनी "ईस्ट इंडिया कंपनीची" राजवट अमेरिकेत होती,  ईस्ट इंडिया कंपनी इतर आशियायी वसाहती मधून कच्चा माल घेऊन जायची त्यावर ब्रिटन मध्ये मोठं-मोठ्या कारखान्यात प्रक्रिया करून तो पक्का माल/वस्तू अमेरिकेत वसाहती मध्ये विकला जायचा. त्याचा मजबूत नफा कंपनीला व्हायचा, त्यावेळेसच्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेत कंपनीला खूप महत्व होते, कंपनीतून येणारे पैसे ब्रिटन करिता महत्वाचे उत्पन्नाचे साधन होते. अमेरिकेत वसाहतीत राहणारे लोक हे मुळातील ब्रिटनचे नागरिक होते आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामुळे ब्रिटन नागरिकांना सुद्धा त्रास व्हायला सुरवात झाली होती. आशा वेळीच १० मे १७७३ ला ब्रिटिश पार्लिमेंटने अमेरिकेवर व एकूणच सर्व वसाहतीं वर एक कायदा थोपला त्याचे नाव "टी ऍक्ट"(Tea Act) होते, या कायद्यानुसार कंपनीला चहाच्या आयात व विक्रीचे एकाधिकार मिळणार होते, त्यामुळे बाजारात (अमेरिकेतील व इतर वसाहतेतील) कंपनीची monopoly तयार होणार होती. या कायद्यातून कंपनीच्या महसुलात वाढ होणार होती पण त्यापेक्षा महत्वाचे कारण सर्व वसाहतींच्या बाजार पेठेत कंपनीचा धाक निर्माण करणे हे होते. विशेष म्हणजे हा कायदा निर्माण करताना ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये इतर वसाहती प्रमाणे अमेरिकेचे सुद्धा प्रतिनिधीत्व नव्हते. तरी असा एक कायदा निर्माण करून ब्रिटन ईस्ट इंडिया कंपनी च्या फायदा करण्याकरिता प्रयत्न करत होता.


१६ डिसेंबर १७७३ रोजी अमेरिकेतील बॉस्टन बंदरात ईस्ट इंडिया कंपनीची डार्टमाऊथ, एलेनोर आणि बेअवेर या नावाची तीन जहाजे येतात, या जहाजा मध्ये भरून चीन व भारतातून आणलेला चहा होता. तो चहा अमेरिकेत विकण्याचा सर्वाधिकार कंपनीला "टी ऍक्ट" नुसार मिळाला होता. या विरोधात अमेरिकेच्या वसाहतीने या तीन जहाज भरून असलेला चहा वापस पाठवण्याची विनंती Massachusetts च्या गव्हर्नर Thomas Hutchinson ला केली, गव्हर्नर ने ती फेटाळून लावली, त्याविरोधात अमेरिकन स्वातंत्र्ययोद्धा Samuel Adams यांच्या नेतृत्वा खाली बॉस्टनच्या बंदरात "टी पार्टीचे" आयोजन केले, या पार्टीला "सन ऑफ लिबर्टी" चे ६० कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी १६ डिसेंबर च्या रात्री ईस्ट इंडिया कंपनीच्या तीन जहाज मधील ३४२ लाकडी पेट्यातील चहा बॉस्टन च्या समुद्रात ओतून दिला. त्यावेळेस पासून या घटनेला "बॉस्टन टी पार्टी" म्हणून ओळखले जाते, या घटने नंतर अमेरिकी लोकांत चहाचे प्रेम कमी होऊन कॉफी ची आपुलकी निर्माण झाली असावी.

अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची खरी सुरवात या बॉस्टन टी पार्टी पासून झाली व त्या घटनेचा नायक Samuel Adams हे अमेरिकेच्या Founding Fathers पैकी एक होते. नंतर च्या काळात ते Massachusetts चे चार वेळेस गव्हर्नर सुद्धा राहिले.



धागा आवडला असेल तर जरूर RT करा विराज देवडीकर

Sunday, 3 May 2020

मनोरंजन.....करोनाच्या पार्शवभूमीवर


रामायण मालिका पूर्ण झाली, काल दुरदर्शने एक ट्विट करून सांगितले १६ एप्रिल या दिवशी ७.७ करोड लोकांनी रामायण पहिले त्यामुळे रामायन जगातील सर्वात जास्त पाहिले जाणारी मालिका ठरले आहे. या अगोदर गेम ऑफ थ्रोन्स १७.४ मिलियन तर बिग बँग थेअरी १८ मिलियन लोकांनी पहिले. पुनः प्रसारित रामायणाने विश्व कीर्तिमान स्थापन केला आहे. ही माहिती मागच्या दोन तीन दिवसात सर्वत्र झालेली आहे त्याबद्दल विशेष बोलणे असे काही नाही. मुळात दूरदर्शन वर या मालिका पुनः प्रसारित व्ह्ययला लागल्या तेव्हाच भारतातील काही लोकांच्या पोटात दुखायला लागले होते, त्रास व्हायला सुरवात झाली होती. रामायण-महाभारताने कोठे करोना बरं होणार आहे का? दूरदर्शनचे भगवा कारण झाले आहे. रामायण-महाभारत दाखवून करोना रुग्णाची संख्या दडपण्याचा सरकारची योजना आहे असे एक न अनेक गोष्टी चर्चा केली गेली. पण सामान्य प्रेक्षकांनी आणि भारतीयांनी या सर्व कथाकथित विचारवंताना फाट्यावर मारत रामायणा ला सर्वात जास्त View दिले. अर्थात ही बाब आपल्या सर्वाना मान्य करावीच लागेल की रामायण-महाभारत कधीच करोना महामारी चा प्रभाव कमी करू शकणार नाही किंवा त्यावर हे (मालिका) औषध ही असणार नाही कारण ते जसे आध्यात्मिक धारावाहिक आहेत तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आहेत. या मालिका पुःप्रसारित नसत्या झाल्या तर या लॉकडाऊन च्या ४०-४५ दिवसाच्या काळात मनोरंजन ही एक खूप मोठी समस्या भारतात निर्माण झाली असती, वाटायला तशी सामान्य पण प्रचंड भयानक स्वरूपाची समस्या आहे,"मनोरंजन"

करोनाच्या पार्शवभूमीवर याचा थोडा विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटते. मनुष्याची महत्वाची  गरज ही मनोरंजन आहे, व हे कोणीच नाकारू शकत नाही. काळानुरूप त्याचे महत्व आणि स्वरूप यात नक्कीच बदल झालेले आहेत व व्यक्तिसापेक्ष मनोरंजन मनुष्याच्या स्वभावात असते. एकाएकी करोनाच्या विस्फोट मुळे ज्या प्रमाणे इतर मानवाच्या गरजा वरती त्याचा परिणाम झाला त्याच प्रमाणे मनोरंजन क्षेत्रावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. पर्यटन हे एक महत्वाचे मनोरंजनाचे साधन या काळात पूर्ण पणे बंद आहे, लोक संचय व लोकांचे एकत्र येणे यावर बंधने आहेत, त्यामुळे नवीन चित्रपट, नाटक, मालिका निर्मिती बंद आहेत, चित्रपट व नाट्यगृह सुद्धा पूर्णपणे बंद आहेत. कुटुंब आणि घरातील सदस्या शिवाय इतर कोणाशी सुद्धा संपर्क ठेवणे, भेटणे, बोलणे धोका दायक ठरत आहे. सततच्या येणाऱ्या वाईट बातम्या आणि या महामारीमुळे होणारे लोकांचे हाल या शिवाय कानावर काही पडत नाही, या महामारी नंतर येणारी आर्थिक मंदी ही वेगळीच समस्या असंख्य लोकांसमोर आज जागतिक स्थरावर उभी आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या, काम, व्यवसाय या महामारी मुळे बंद पडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात मनुष्य प्रचंड मानसिक तणावातून जात आहे अशावेळी मनोरंजन खूप महत्वाची भूमिका बजावत असते, मानसिक आधार आणि पुनः उभे राहण्याचा विश्वास मनोरंजनातून येत असतो. अनेक उदाहरणे देत येतील ज्यामुळे प्रेरित होऊन अशा मानसिक समस्यावरती मत केलेली आहे.
या मालिका, चित्रपट आपल्या मनावरील ताणा ला दूरकरण्याचं काम करतात, व त्यामुळेच रामायण मालिका मागील काही दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिली गेली असे मला वाटते

धन्यवाद

विराज
viraj.devdikar@gmail.com

विचार पटल्यास जरूर शेअर करा आणि लिहा  

Tuesday, 21 April 2020

विश्वंतर



दिवंगत जगविख्यात शास्त्रज्ञान स्टीफन हावकिंग यानी काही वर्षां खाली एक भविष्यवाणी केली होती, २६०० व्या शतकात पृथ्वी अग्निचा गोळा होईल आणि २०१७ मध्ये त्यांनी अजून एक भाकीत केले होते ते म्हणजे मानवतेला पृथ्वीवरील फक्त १०० वर्ष उरले आहेत. पृथ्वीच्या ऱ्हासास मानव आणि फक्त मानवच जवाबदार असणार आहे हे निश्चित आहे. मागील काही दिवसांपासून चालू असलेला उत्तर कोरिया आणि इतर देश हा संघर्ष पहिला तर हे स्पष्ट जाणवेल. जागतिक राजकारणावर मी फार बोलणार नाही. एक कल्पना करून तर पाहू, विश्वांतराची.....
म्हणजे असे पहा, आताची जी माझी पिढी आहे की ज्याचे वय २० ते ४० मध्ये आहे अशी पिढीचे नातवंड-पतवंड अशा विश्वांतराचे भाग असतील. आजची प्रचंड गजबजलेली भारतातील शहरे त्यावेळी अक्राळ विक्राळ रूप घेऊन जगा समोर उभे असतील. लोकसंख्येची झालेली भरमसाठ वाढ व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पृथ्वीला नष्ट करायला पुरेश्या असतील. ग्लोबल वॉर्मिंग मुळे पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असेल. सामान्य माणसाला उघड्या अंगाने सूर्यप्रकाशात फिरणे कठीण झालेले असेल ठीक ठिकाणी Ozone स्थराला भोक पडली असतील त्यातून अतिनील किरणांचा मारा पृथ्वी वर होत असेल. पृथ्वीवरील काही भाग निर्मनुष्य व निरवृक्ष झालेला असेल. त्या भागात जायचे असल्यास oxygen सायलेंडर घेऊन जावे लागेल. पाण्याची स्थिती वेगळीच असेल, समुद्र पातळीत प्रचंड वाढ झाल्याने खारे पाणी विपुल आणि नद्या कोरड्या असल्यामुळे पिण्यासाठी पाणी नसेल. समुद्र काठची शहरे पाण्याखाली गेलेली असणार आहेत. मानवाचे आयुष्यमान निम्यावर म्हणजे वय वर्ष ५० झालेले असेल, कारण भरमसाठ लोकसंख्या वाढी मुळे ५० पुढील व्यक्तींना वाचवण्यासाठी आरोग्य आणि इतर सुविधांचा अभाव असणार आहे. पेट्रोल व खनिज तेल संपल्यामुळे बायो फ्युवेल वर अवलंबून राहावे लागेल त्याच्या उत्पादना साठी प्रचंड जंगल तोड किंवा वनव्याने जंगले संपवली असतील, खरवलेल्या जमिनी आणि अती रसायनाच्या वापरामुळे कृषी उत्पन्न घटले तर असेलच पण त्याची गुणवत्ता आणि चव संपली असेल. 

राजकीय समस्या तर यापेक्ष खूप भयानक असतील, जागतिक पातळीवर इस्लामिक radical संघटना आणि विस्तारवादी चीन त्यांच्या ताब्यात जगाचा खूप मोठा भाग असेल, त्यामाध्यमातून धार्मिक आणि राजकीय परतंत्र निर्माण झाले निर्माण झालेले असेल. संवेदना बोथट झालेल्या असतील आणि आर्थिक विषमता प्रचंड असेल. याच काळात AI (Artificial intelligence) मुळे राजकीय व सामाजिक प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली असेल, आजच्या छोटया प्रमाणात होणाऱ्या Data theft मग ते सोशल मीडिया द्ववरे असेल किंवा इतर मार्गाने असेल तेच उद्याचे AI चा राक्षस तयार करेल. माणसाचे हुबे-हब clone चीन ने तयार केलेले असतील व त्याच्याच फौज उभारल्या असतील.
माणसाला व मानवतेला वाचवन्यासाठी मंदिरे कदाचित नसतील ही पण सोबत चर्च आणि मशिदी सुद्धा नसतील, माणसा कडे विश्वंतर करण्याशिवाय पर्याय नसेल. मंगळवासी आणि चंद्रकर ही कदाचित नवीन मानवतेची ठिकाणे असतील....

हे एक कल्पना चित्र आहे पण कल्पना वास्तव होऊ नये 

(वरील लेख २०१८ मध्ये लिहलेला आहे त्यामुळे आजचे संदर्भ नाहीत)

Viraj Devdikar

#Doomesday #World_Earth_Day #SaveEarth #Human