इंग्रजी आणि उर्दू/फारसी
मध्ये एक म्हण (phrase) आहे, ती म्हण दोन्ही म्हणजे
इंग्रजी आणि उर्दू/फारसी संस्कृतीचा एक पैलू दाखवायला मदत करते. ती म्हण "Everything fair in love and war"
आणि उर्दू/फारसी
"इश्क और जंग में सब जायज है". पाश्चिमात्य संस्कृतीची प्रेम आणि युद्धा
बद्दल ही मांडणी आपण मागील अनेक वर्षांपासून स्वीकारत आलो आहेत. मात्र भारतीय
संस्कृती मध्ये प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ/न्याय्या आहे असे होत नाही. भारतीय
संस्कृतीत प्रेमाचा एक "त्याग" आहे तर युद्धाचा एक "धर्म"
असतो. येथे धर्म या शब्दाचा अर्थ प्रार्थना पद्धती नाही तर तत्व/नियम घ्यावा. युद्धाचा
नियम असतो आणि प्रेमाचा त्याग असतो असे भारतीय संस्कृती म्हणते. हे सगळे
सांगण्यामागे नुकत्याच येऊ घातलेल्या एक चित्रपटाची पार्शवभूमी आहे.
"दि केरळ
स्टोरी" हा विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि सुदीप सेन दिग्दर्शित चित्रपट
येत्या ५ तारखेला प्रदर्शित होत आहे. मागील आठवड्यात त्याचा ट्रीजर आला आणि तो
मोठ्या प्रमाणात पहिला गेला सोबत viral सुद्धा झाला. मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल
मीडिया दोन्ही मध्ये या चित्रपटा बद्दल चर्चा मागील सहा-सात दिवसा पासून होत आहे.
हा चित्रपट केरळ मधील मागील काही वर्षा पासून गायब झालेल्या ३२००० तरुणी/महिलांची कथा सांगतो असे निर्माते आणि दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. हा
चित्रपट सत्य घटनेवरती आधारित आहे असे सुद्धा निर्मात्याचे म्हणणे आहे. एका
विशिष्ट पंथाच्या तरुणी/महिलांना प्रेम जाळ्यात अडकवून त्यांचे धर्म परिवर्तन केले
जाते आणि ISIS या कट्टरतावादी संघटनेत
सामील करून त्यांचा आतंकवादी कार्यात उपयोग केला जातो असे या चित्रपटाच्या ट्रीजर
मध्ये दिसते. या एका कारणामुळेच या चित्रपटा बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे व
त्याच मुळे उजव्या व डाव्या विचारसरणीत या बद्दल चर्चा होत आहे. या चित्रपटात
दाखवणायत आलेल्या सर्व घटना व पात्र किती खरी व खोटी हे आताच चित्रपट न पाहता
सांगणे कठीण आहे. मात्र या चित्रपटातील मांडणी १००% अयोग्य आहे असे म्हणणे चुकीचे
ठरेल. चित्रपटाच्या चांगल्या वाईट बाबींवर चित्रपट पाहून भाष्य करणे योग्य होईल.
डावी विचारसरणी आणि देशातील प्रमुख विरोधी पक्ष या चित्रपटाला प्रपोगंडा मुव्ही
म्हणत आहे आणि या चित्रपटा द्वारे एखाद्या विशिष्ट समजला टार्गेट केले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाला केरळ राज्याच्या
मुख्यमंत्र्यांच्या सोबत काँग्रेस च्या प्रमुख नेत्याने विरोध केला आहे. माध्यमं मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शना पूर्वीच चर्चा सुरु
झाल्यामुळे चित्रपटाचे महत्व वाढले आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपट गृहात
प्रदर्शित होत आहे, हा चित्रपट पाहून त्यावर
भाष्य करणे योग्य ठरेल.
धन्यवाद

No comments:
Post a Comment